मालपूर गावातील घंटा गाडीची बत्ती गुल घंटा गाडी पुन्हा नव्यान सुरू करा गावकर्याची मागणी मालपूर ( प्रभाकर आडगाळे) दि. ०१ - मालपूर हे गाव शिंदखेडा तालुक्यातील सर्वात मोठेगाव परंतु येथे प्रशासक राज आल्यापासून नागरीकाच्या समस्या चा आखाडाच बनला आहे. १७ वार्डात घाणेचे साम्राज्य तयार झाला आहे. कचरा वाहणारी गाडीच येत नसल्यामुळे प्रत्येक वार्डात कचराचा डिग भरलेला दिसून येतो .एक ग्रामपंचायत सेवकाला विचारले असता तो म्हणाला कि ग्रामपंचायती वसुली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगाराचा अभाव आहे.दुसरी गोष्ट अशी कि कचराडेपो नसल्यामुळे गाडी बंद आहेजर नागरीकाना सुविधाचा अभाव असेल तर कर मागण्याचा अधिकार पंचायतीला नाही किंवा प्रशासकाला नाही. अशी वाऱ्यावर असलेली ग्रामपंचायत काय ? कामाची येथील पाढरे पोशाखात फिरणाऱ्या पुढारीही दिशाहीन आहेत. जवळच दोन किमीवर असलेले सुराय ग्रामपचायत चे दर्जेदार काम व तेथील घरोघरी फिल्टर पाणी मिळते.मालपूरच्या सुज्ञ नागरीक हो उघडा डोळे पहा नीट मालपूर व सुराय ग्रामपचायत ही भाजपा सत्तेवर आहेत. मग अशी तफावत का.यांचे साधे उत्तर सुशिक्षित आणि अशिक्षित सरपंच होय. जर अशीच परिस्थिती राहिलीतर मालपूरचा विकास संपला आहे असे समजावे. पुन्हा सुरू करा कचरागाडी अशी मागणी मालपूरच्या नागरीकांची आहे.
byloksahi.varta.news
-
0